विचार
विचार म्हणजे शब्द . भाषा म्हणजे शब्दांचा
उपयोग. दोन्ही मिळुन कल्पनांच्या प्रतिमा
निर्माण होतात. अशा अनेक कल्पना लहानपणापासुनच साठवलेल्या असतात. त्या माणुस
बोलतो. म्हणजे संवाद करतो. संवाद म्हणजे प्रतिमांची देवघेव असते. पण या प्रतिमा
कालसापेक्ष असतात. बदलत्या जीवनपद्धतीनुसार त्या कालबाह्य ठरतात. म्हणुन प्रत्येक
पिढीला मागच्या पिढीचे विचार कालबाह्य वाटतात. निरर्थक किंवा जुनाटही वाटतात.
विशेष म्हणजे अशावेळी मनाची लवचिकता, विचारांची दिशा बदलायला पाहिजे, समोर आलेली वेगळी वेळण समजुतदारपणे बदलत
गेलो, तर नवा जीवन प्रवास सुखकर होतो.
आपले
आरोग्य व शरीराची स्थिती, यावरही
आपल्या आवडीचे विषय ठरतात. मन आणि शरीर दोन्हीही कणखर असतील तर त्याचे आयुष्य
त्याप्रमानेच चिरतरुण रहाते.तरुणपणात अनेक विषयात गति, रुची,
आणि विविध कार्ये केलेली असतील तर ती व्यक्ती वाढत्या वयातही अनेक
प्रकारची कामे अंगीभुत धाडसी वृत्तीने स्विकारतो.
सध्या आपण जे आहोत त्याचा “स्विकार” करावा म्हणजे “समाधान”! आपल्या
व्यक्तिमत्वाच्या घडणीमध्ये मन – समाज आणि स्वत:बद्द्लची जाणीव यांचा मोठा वाटा
असतो. मी आहे याची जाणीव म्हणजे अस्मिता . अशा प्रकारे अस्मिता एकसंघ एकजीव पण
पक्की होत जाते. प्रत्येक अनुभवाबरोबर तिच्यामध्ये भर पडत जाते. ही जाणीव जेवढी
अखंड , एकसलग व नितळ असेल तेवढे आपले स्वत:बद्दलच
समाधान अधिक असत. स्वभावाचे पैलु एकत्र राखण्यात जेवढ यश येईल. तेवढे समाधान अधिक
होईल.
वाढ्त्या वयाबरोबर शरीराने सतत काहीतरी करण्यात
स्वत:ला गुंतवून ठेवल म्हणजे व्यर्थ विचार करायला वेळच मिळत नाही आणि त्यातुनच
वेगळ समाधान मिळत. समाधान अधिकाधिक मिळणे हेच मन तरुण करण्याचे महत्वाचे कारण
ठरत.सतत कामात राहण्याला एकटेपण जाणवतच नाही.
आपल्याला
जिथे पोहोचायचे आहे त्याच कल्पनाचित्र आपल्या स्वत:चच असाव. आपल मन आपल्या बरोबरच
असाव. जे बोलतो ते सकारात्मक , कार्यशील
असाव. त्यासाठी कणखरपणा आणि सातत्य असेल. तर आपली उद्दिष्ठ गाठता येतात. जो पर्यत
आपण दैनंदिन काम करु शकतो, व्यवसायात बिनचुक वागू शकतो,
निर्णय ठीक घेऊ शकतो, तो पर्यत अजिबात घाबरु
नये. विचारांचा सगळा गुंता व कचरा फेकून दिला सरळ साधा विचार समोर येतो. त्यातुन
आपल जगण सोपे कराव. आपल्याला पाय मोकळा राखण जमल की आनंद होतो.
No comments:
Post a Comment