प्रेमाची ग़ोष्ट
एकदा सर्व भावना संवेदना – जाणीवा आपल्या स्वभावानुसार मौज करण्यासाठी एका
बेटावर एकत्र आले होते. अचानक एक भयानक तुफान आले. ज्या बेटावर ते जमले होते ते
बेट सोडुन जाण्याची सर्वानाच पाळी आली. अचानक घोषणेमुळे सर्वांचा गोंधळ उडाला.
सर्वजण आपापल्या होडीकडे जाऊ लागले. त्यात वादळाने त्यांची होडी फुटली होती.
ते दुरुस्थ करु लागले. पण प्रेमाला मात्र अजिबात घाई नव्हती. पण जस
जशी संध्याकाळ झाली. तेव्हा त्यालाही वाटले की, येथुन जायला
हवे. परंतु आता तिथे कोणतीच होडी नव्हती. प्रेम सगळीकडे आशेने बघु लागला. तेव्हा
आनंद एका आलीशान होडीत बसलेला दिसला. प्रेम ने त्याला विचारले तुझ्या होडीत मला
जागा देशील का? तो म्हणाला नाही, माझ्या
नावेत खुप धन ,सोने ,चांदी ठेवले आहे
त्यात आता जागा नाही. थोड्यावेळाने त्याला सुंदरता नावेतुन जाताना दिसली. मी एकटाच आहे, मला तुझ्या स्वत:च्या होडीत जागा
देशील, ती म्हणाली नाही. माती चिखलाने भरलेल्या तुझ्या
पायाने माझी होडी घाण होईल. काही वेळाने दु:ख तेथुन होडी घेऊन जात होते. त्याला
प्रेमाने मदत मागीतली. ते म्हणाले, मी खुप दु:खी आहे.
मला एकटच राहायच आहे. आता प्रेमाला एकट पडल्यासारखे वाटु लागले.
त्याला वाटले आपली कोणालाच गरज नाही. माझ्या जीवनात असच नेहमी घडत.
तेवढ्यात एक आवाज आला. ये प्रेम माझ्या होडीत ये, बस मी
तुला घेऊन जाईन . प्रेम आवाज ओळखु शकला नाही. पण तो लगेच
त्याच्या होडीत बसला. त्याने त्यावेळी कसलाही विचार केलाच नाही. होडीतुन उतरल्यावर
त्याला “ज्ञान” भेटले. प्रेमने त्याला विचारले
ज्ञान तु सांग माझी मदत कोणी केली ? ज्ञान म्हणाला ती
वेळ होती. पण वेळने माझी का मदत केली ?
कारण वेळच तुझे महत्त्व जाणु शकते. नेहमी आपण आनंद , दु:ख ,
सौंदृर्य, यात प्रेमाकडे दुर्लक्ष करतो तेव्हा
वेळेमुळेच आपल्याला जीवनात प्रेमाचे महत्त्व समजते. त्यावेळी ते सत्य असत.